ball

सावधान आयपीएल विस्तारतंय…

by Prof. Harshad Chaphalkar

विराट कोहली ने  बॉर्डर – गावस्कर मालिकेतील शेवटच्या कसोटीत 186 धावांची खेळी केली आणि तिकडे वेलींगटन मध्ये केन विल्यम्सन ने पाठोपाठ शतके ठोकून भारत- ऑस्ट्रेलिया WTC फायनल वर शिक्कामोर्तब केल्यानंतर सगळ्या क्रिकेट प्रेमींचा फोकस भारतात खेळवल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या WPL कडे वळल्या आणि अपेक्षेप्रमाणे BCCI चा हा जुगार ही अगदी सुपरहिट ठरला… सुरुवातीपासून सुसाट सुटलेली मुंबई इंडियन्स शेवटच्या काही सामन्यात धक्के खात RCB आणि UPW ला काही दिवसांसाठी आशेचा किरण दाखवून अखेर अंतिम सामन्यात MI विजयी झालीच आणि WPL जिंकणारी पहिली कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर ची इतिहासात नोंद झाली.. पहिले विजेते कायम लक्षात राहतात..हा सगळा खेळ 26 मार्च 2023 ला संपला आणि पुन्हा लक्ष IPL च्या सोळाव्या हंगामा कडे वळलं..या वेळच्या हंगामात काही आमूलाग्र बदल झालेत त्याचा थोडा आढावा घेऊया..
१. टॉस नंतर प्लेइंग 11
यंदा पहिल्यांदाच अस होणार आहे की कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर आपल्या प्लेइंग 11 त्याला ठरवता येणार आहे.. टॉस होईपर्यंत कर्णधाराला खेळपट्टी, दव आणि प्रतिस्पर्धी संघाची संघरचना याचा अंदाज आल्यावर प्लेइंग 11 घोषित करताना कदाचित यातून टॉस चं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवतंय अन्यथा भारतात अनेक असे स्टेडियम आहेत जिथे टॉस जिंकला की मॅच 70-75% जिंकल्यात जमा असते…
२. इम्पॅक्ट प्लेयर: आयपीएल च्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग होणार आहे जिथे टॉस च्या वेळेला कर्णधाराला प्लेइंग 11 बरोबरच 5 इम्पॅक्ट प्लेयर सुचवायचे आहेत.. या पाच प्लेयर पैकी एक खेळाडू मॅच च्या कुठल्याही क्षणी प्लेइंग 11 मधील खेळाडूला बदली म्हणून खेळवला जाऊ शकतो.. उदा. एखादा खेळाडू फक्त बॉलिंग च्या कामाचा आहे तर त्याची 4 ओव्हर बॉलिंग झाल्यावर त्याच्या बदली एक पूर्ण बॅटर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवला जाऊ शकतो..
३. वाईड साठी तिसऱ्या अंपायर चा रिव्ह्यू आतापर्यंत एलबीडब्ल्यू, कॅच, यासाठी प्रामुख्याने डी आर एस खेळाडूंकडून वापरला जायचा आता मात्र या हंगामापासून मैदानावरील अंपायर दिलेला वाईड बॉल ही तिसऱ्या अंपायर कडे रिव्ह्यू साठी पाठवला जाऊ शकतो पण, असे करताना एकूण रिव्ह्यू ची संख्या प्रति इनिंग 2 इतकीच ठेवली आहे… मोक्याच्या क्षणी हा रिव्ह्यू मॅच ची उत्कंठा वाढवणार आहे…
४. टीव्ही आणि डिजिटल ब्रॉडकास्टर वेगवेगळे: गेले पाच वर्षे टीव्ही तसेच डिजिटल प्रसारणाचे हक्क स्टार इंडिया आणि डिस्ने प्लस हॉटस्टार कडे होते मात्र 2023- 27 च्या कालावधी साठी आता ते वेगवेगळ्या स्टार (टीव्ही) आणि जिओ सिनेमा (डिजिटल) कंपन्यांकडे गेल्यामुळे त्या कंपन्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय.. स्टार ने कोहली ला टीव्ही वरच आयपीएल पाहणे किती सुखद आहे हे पटवण्यासाठी उतरवलंय तर तिकडे जिओ सिनेमा ने धोनी आणि सचिन ला मैदानात डिजिटल प्रचारासाठी उतरवलंय…
५. प्रादेशिक भाषेतील समालोचन: साधारण 2007-08 च्या सुमारास निम्बस भारताच्या आंतरराष्ट्रीय सामान्यांसाठी पूर्ण वेळ हिंदी (फक्त भारतासाठी)आणि इंग्रजी (जागतिक) असे समालोचन सुरू केल्यापासून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून तीच परंपरा पुढे स्टार ने सुरू ठेवली हळू हळू ती कानडी, तमिळ, तेलगू आणि बांगला भाषेपर्यंत वाढवली पण हे करत असताना त्यांना टीव्ही चॅनेल्स वाढवावे लागले आणि परिणामी मुख्य चॅनेल चा टीआरपी कमी झाला…आता स्टार आणि जिओ हे टीव्ही आणि डिजिटल वेगवेगळे प्रसारण झाल्यामुळे प्रादेशिक प्रक्षेपण साठी जिओ ने तगडी फौज उतरवली आहे..पारंपरिक दक्षिण भारतीय तमीळ, तेलगू, कानडी, बांगला याला जोड पंजाबी, मराठी आणि भोजपुरी ची दिली आहे कारणाने प्रादेशिक भाषेतील प्रक्षेपण चा विस्तार झाला आहे…मराठीत पूर्वी भावे, कुणाल, दाते, विनोद कांबळी तर भोजपुरीत रवी किशन सुरुवातीच्या काही सामन्यात अतिशय धुमाकूळ घालत आहेत…सुपला शॉट, वावरच्या बाहेर, या शब्दांची समाज माध्यमांमध्ये हवा आहे…
पण म्हणतात ना सोळावं वरीस धोक्याचं रं सोळावं वरीस धोक्याचं…तसेच काही धोके या आयपीएल च्या विस्तारमध्ये देखील आहेत…
१. वाढती सामन्यांची संख्या:
10 संघ असूनही या हंगामात एकूण सामन्यांची संख्या BCCI ने कशीतरी करून 74 वर ठेवली आहे 2024 पासून एकूण सामन्यांची सांख्य 94 हो हो 94 पर्यंत जाणार आहे…म्हणजे किमान दोन ते अडीच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला सुट्टी. आधीच ICC चे FTP भरगच्च असताना IPL साठी दोन अडीच महिने कुठून काढायचे हा यक्ष प्रश्न आहे आणि ICC चे एकूण उत्पन्न च्या 80 % उत्पन्न भारत आणि परिणामी BCCI कडून जात असल्याने तो दोन अडीच महिन्याचा कालावधी काढवाच लागणार आहे अन्यथा ICC नावाची व्यवस्था कोलमडेल..
२. खेळाडूंच्या दुखापती: आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात दुखापत ग्रस्त असणारे खेळाडू आयपीएल ला बरोबर तंदुरुस्त होतात आणि आयपीएल मध्ये दुखापत होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला मुकतात त्याला एकमेव कारण पैसा.. क्रिकेट बोर्डाच्या कॉन्ट्रॅक्ट प्राप्त खेळाडूंपेक्षा कित्येक पटीने जास्त पैसा आयपीएल च्या कॉन्ट्रॅक्ट मधून मिळत असल्याने खेळाडू अपसूक आयपीएल कडे वळतात आणि राष्ट्रीय कर्तव्याला मुकतात..
३. सार्वत्रिक निवडणूकांशी ताळमेळ: 2024 हे भारतात सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष आहे.. कितीही झालं तरी आयपीएल मार्च च्या आधी सुरू होऊ शकत नाही आणि जून च्या आधी संपू शकत नाही…प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुका या देखील एप्रिल मे मध्येच आहेत अश्या वेळी व्यवस्था आणि नियोजन यावरील ताण हे तारेवरची कसरत BCCI आणि भारत सरकार या दोघांसाठी असणार आहे..याआधी 2009 च्या निवडणुकीवेळी दक्षिण आफ्रिका 2014 साली संयुक्त अरब अमिराती मध्ये आयपीएल खेळवली गेली होती. 2019 साली मात्र ती भारतातच झाली…

एकूणच आयपीएल विस्तारतंय आणि यौवनाच्या उंबरठ्यावर आहे…

To know more about Crickatha